के. टी. एच. एम. महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप
Category : Uncategorised
साहित्य, संस्कृती, समाज व माध्यमांतर या विषयाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये दोन दिवस जे विचारमंथन झाले.त्यातून प्रत्येकाला येथून सामाजिक जाणीवेतून काहीतरी घेऊन जाता येईल. या ठिकाणी तीनही भाषांच्या माध्यमातून साहित्याचे विविध अंगांनी जो अभ्यास झाला, त्यातून समाज व समाजातून संस्कृतीचे दर्शन घडले. साहित्याचे समाज आणि संस्कृतीमध्ये मोठे महत्व असून साहित्याच्या माध्यमातूनच नटसम्राट, पु.ल. देशपांडे यांच्यावरील भाई यासारख्या चित्रपटांची निर्मिती झाली असे मविप्र संचालक सचिन पिंगळे यांनी सांगितले ते के टी एच एम महाविद्यालय मराठी, हिंदी व इंग्रजी विभागाच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप प्रसंगी व्ही.एल.सी सभागृहात बोलत होते.यावेळी व्यासपीठावर मॉरीशसच्या श्रीमती मधुमती कौंजुल, लक्ष्मी झुम्मून, नेपाळ चे प्रा.लक्ष्मण ग्यानवळी, श्रीलंकेचे प्रा.उपुल रणजीत तसेच डॉ. मृगेंद्र पाटील (मुंबई), डॉ. संजय करंदीकर व डॉ. नवनीत चव्हाण (गुजरात), डॉ.करूणा उपाध्याय व डॉ.अभिजित देशपांडे (मुंबई), डॉ.संजीवकुमार जैन (भोपाळ), डॉ.पौर्णिमा कुलकर्णी, समन्वयक डॉ. पी. व्ही.कोटमे, डॉ. डी. पी. पवार, डॉ. वाय. आर. गांगुर्डे उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.बी.गायकवाड यांनी ‘ विज्ञान आणि सामाजिक शास्र विषयांच्या चर्चासत्रांचे आयोजन बऱ्याच ठिकाणी केले जाते मात्र भाषेचा विषय घेऊन आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्याचे निश्चित केले,यामागील हेतू हाच होता कि ‘ विविध देशातील आपल्या असलेल्या संस्कृती,परंपरेचे दर्शन तसेच यासंदर्भातील माहिती विद्यार्थी व संशोधकांपर्यंत पोहोचविणे. आजच्या काळात ई-लर्निंग,पी लर्निंग आणि एम (मोबाईल ) लर्निंग चा अवलंब केला जात असतांनाही या परिषदेसाठी ठेवण्यात आलेल्या विविध विषयांमधून जे विचारमंथन झाले,तसेच संशोधकांनी जे अभ्यासपूर्ण पेपर सादर केले त्याचा निश्चितच उपयोग सगळ्यांना होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी परिषदेच्या यशस्विते व आयोजनासंदर्भात काही संशोधकांनी आपले विचार व्यक्त केले यात डॉ.सालेम अब्दुल कवीद (येमेन) यांनी सांगितले कि ‘ या परिषदेतून भारतीय संस्कृती आणि साहित्य याच्या आम्ही खूप जवळ आलो.मानवतेचे एक प्रतिक आम्हाला भारतात बघायला मिळाले.आम्ही एक परिवार म्हणून या ठिकाणी राहिलो.
या दोन दिवशीय चर्चासत्रामध्ये जी विषयांची निवड करण्यात आली होती,त्या विषयांवर सर्व संशोधकांनी अभ्यासपूर्ण शोधनिबंध सादर केले.यामधून आपली संस्कृती हि केवळ भारतातच नव्हे तर विदेशातही टिकून राहिलेली आहे असे डॉ.पोर्णिमा कुलकर्णी यांनी सांगितले.
डॉ.मधुमती कौंजून यांनी या चर्चासत्रातून आम्ही आपली संस्कृती,परंपरा आणि भाषा हि मॉरीशस या देशामध्ये मोठ्या प्रमाणात टिकविलेली आहे.आपल्या भाषेच्या संवार्धानासाठि आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत असे सांगितले ‘
यावेळी मान्यवरांच्या हस्ते सहभागी संशोधकांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. सुत्रसंचलन प्रा. तुषार पाटील यांनी तर आभार डॉ.दिलीप पवार यांनी मानले.