बहुजन हिताय बहुजन सुखाय

मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक.

Maratha Vidya Prasarak Samaj, Nashik.

Central Office, Shivaji Nagar, Gangapur Road, Nashik-422002, Maharashtra, India.

Monthly Archives: August 2019

  • -

जनता विद्यालय गांधीनगर चा सुवर्ण महोत्सव संपन्न…

Category : social_projects

मविप्र संचलित जनता विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव सांगता समारंभ संपन्न झाला,यावेळी प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ साहित्यिक उत्तमराव कांबळे उपस्थित होते.तसेच कार्यक्रमप्रसंगी संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार,चिटणीस डॉ.सुनिल ढिकले,संचालक नाना महाले,भाऊसाहेब खताळे,प्रल्हाद गडाख,सचिन पिंगळे,माजी महापौर अशोक दिवे,नगरसेविक  राहुल  दिवे, आशा तडवी,सुषमा पगारे,सेवक संचालक प्रा.नानासाहेब दाते,गुलाबराव भामरे,सौ.नंदा सोनवणे,शिक्षणाधिकारी प्रा.एस.के.शिंदे,सी.डी.शिंदे, स्कूल कमिटी सदस्य नामदेव आढाव,योगेश कासार,रामदास लांडगे,गोपीचंद पवार,साहेबराव पवार,योगेश नन्नावरे,अनिल गांगुर्डे,वाल्मीकराव जाधव,शंकरराव खेलूकर,संजय खैरनार,सिद्धार्थ भालेराव,कृष्णकुमार पाटील उपस्थित होते. अध्यक्षस्थानी सभापती माणिकराव बोरस्ते होते.

उत्तमराव कांबळे यांनी आपल्या मनोगतात ‘ सध्याच्या घडीला जुन्या आणि नव्या शिक्षणपद्धतीची सांगड घालणे गरजेचे आहे.तसेच विद्यार्थ्यांमध्ये   सामाजिक जाणीव निर्माण करावी असे सांगत मविप्र संस्था हि अनेक उपक्रमांच्या माध्यमातून परिपूर्ण विद्यार्थी घडविण्यासाठी कायम कार्यरत असल्याचे सांगत संस्थेने आजपर्यंत अनेक सुजाण नागरिक व विद्यार्थी घडविल्याचे सांगितले.

सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार यांनी ‘विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था कायम प्रयत्न करीत असून नवीन शैक्षणिक वर्षापासून दर शनिवार हा अक्टीव्हीटी दिवस म्हणून साजरा केला जाईल तसेच शनिवार हा विनादप्तराचा वार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात सभापती माणिकराव बोरस्ते यांनी संस्थेच्या उभारणीत कर्मवीरांनी मोठे योगदान दिलेले असून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस असून संस्था कायम विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्नवत राहील असे सांगितले.

माजी महापौर अशोक दिवे यांनी त्यांच्या जडण-घडणीत शाळेचा मोठा वाटा असून शाळेच्या ५० वर्षाच्या वाटचालीचा साक्षीदार असल्याचे सांगतांना सुवर्ण महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.प्रास्ताविकात मुख्याध्यापक एस.एम.बच्छाव यांनी शाळेच्या ५० वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेतला.सुत्रसंचलन श्रीमती सुनिता कटाळे यांनी तर आभार श्रीमती माधवी गांगुर्डे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी पर्यवेक्षक बी.जे.बच्छाव,आर.एस.बच्छाव,एन.के.निकम,पी.जी.मुठाळ,आर.के.देवरे,एस.आर.नवले,एस.एल.जाधव व अभिनव बालविकास मंदिर चे कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला वृक्षारोपण करण्यात आले तसेच पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली.


  • -

मविप्रच्या जनता विद्यालय लहवित चा सुवर्ण महोत्सव समारंभ उत्साहात …

Category : social_projects

मविप्र संचलित जनता विद्यालय लहवित चा सुवर्ण महोत्सव सोमवार दि.२५ फेब्रुवारी रोजी उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार ,उपसभापती राघो नाना अहिरे,चिटणीस डॉ.सुनिल ढिकले  उपस्थित होते. व्यासपीठावर संचालक भाऊसाहेब खताळे, प्रल्हाद गडाख, सचिन पिंगळे, रामकृष्ण महाराज लहवितकर, अॅड. एन.जी.गायकवाड, मुख्याध्यापक एस.डी.शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती माणिकराव बोरस्ते होते तसेच प्रमुख व्याख्याते म्हणून दै.सकाळ चे कार्यकारी संपादक श्रीमंत माने उपस्थित होते.

यावेळी बोलतांना श्रीमंत माने यांनी ‘ विद्यार्थ्यांनी उच्चशिक्षण घेऊन नोकरी मिळविण्याच्या मागे न लागता आधुनिक पद्धतीने शेती किंवा व्यवसाय केला पाहिजे. कारण आधुनिक तंत्रज्ञानामुळे नोकऱ्यांच्या संधी दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या आहे. तसेच शेतीला पूरक असा जोडधंदा म्हणून शेतीपूरक व्यवसाय करावा असेही त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार यांनी आपल्या मनोगतात ‘ संस्थेच्या व शाळेच्या विकासासाठी व गुणवत्तेसाठी विद्यार्थी,शिक्षक व पालक यांनी एकत्रित सहकार्य करावे असे सांगितले.

सभापती माणिकराव बोरस्ते यांनी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त उपस्थित सर्व सभासद,विद्यार्थी,पालक व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.जेष्ठ सभासद व शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष डॉ.रामकृष्ण महाराज लहवितकर व अॅॅड.एन.जी.गायकवाड यांनी शाळा स्थापनेचा इतिहास सांगतांना जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कार्यक्रमाचे निमंत्रक व नाशिक ग्रामीण चे संचालक सचिन पिंगळे यांनी शाळेसाठी योगदान दिलेल्या कर्मवीरांच्या व गावातील आजी-माजी सभासदांच्या प्रति आदरभाव व्यक्त करीत त्यांच्याप्रती ऋण व्यक्त केले.

यावेळी ‘ सुवर्णपर्व ह्या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.सुत्रसंचलन श्रीमती ए.डी.लांडे व एस.जी.थेटे यांनी तर आभार आर.व्ही.निकम यांनी मानले. महोत्सवाची सांगता उद्या दि.२६ फेब्रुवारी रोजी हिवरेबाजार चे सरपंच व महाराष्ट्र शासनाच्या आदर्श गाव संकल्पनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या उपस्थितीत होईल.


  • -

मविप्र संस्थेतर्फे शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा सत्कार

Category : social_projects

महाराष्ट्र शासनाच्या वतीने नुकतेच शिवछत्रपती पुरस्कार प्रदान करण्यात आले.यात जिल्ह्यातील रोशनी अशोक मुर्तडक, मोनिका आथरे, अक्षय देशमुख, राजेंद्र सोनार, पूजा जाधव, संजय होळकर हे सहाही पुरस्कारार्थी मविप्र संस्थेचे आजी-माजी खेळाडू, शिक्षक असल्यामुळे मविप्र संस्थेच्या वतीने खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार, सभापती माणिकराव बोरस्ते चिटणीस डॉ. सुनिल ढिकले, उपसभापती राघोनाना अहिरे, संचालक नाना महाले, रायभान काळे, उत्तमबाबा भालेराव, डॉ.विश्राम निकम, डॉ.जयंत पवार, डॉ.प्रशांत देवरे, दत्तात्रय पाटील, अशोक पवार, प्रल्हाद गडाख, प्रा.नानासाहेब दाते, गुलाब भामरे, सौ.नंदा सोनवणे, शिक्षणाधिकारी डॉ. डी.डी. काजळे, डॉ.आर.डी.दरेकर, प्रा.एस.के.शिंदे, सी.डी.शिंदे, डॉ.एन.एस. पाटील उपस्थित होते.


  • -

के टी एच एम प्रिंटींग टेक्नोलॉजी च्या विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे अभ्यास दौरा …

Category : social_projects

के टी एच एम महाविद्यालयाच्या  प्रिंटींग टेक्नोलॉजी विभागातील प्रथम,द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या अभ्यास दौऱ्याचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले होते.या अभ्यासदौऱ्यात विद्यार्थ्यांनी चौथ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रिंटींग प्रदर्शनाला भेट दिली. या जागतिक प्रदर्शनात नवनवीन प्रिंटींग मशिन्स,डिजिटल मशिन्स,पॅकेजिंग मशीन्स ठेवण्यात आले होते.यावेळी विद्यार्थ्यांना थेट प्रिंटींग प्रात्यक्षिकही पहावयास मिळाले.या सोबतच संसद भवन,वाघा बॉर्डर येथेही भेट दिली.यावेळी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी,खा.सुप्रिया सुळे,खा.शत्रुघ्न सिन्हा यांचीही भेट घेतली.यासाठी खा.हेमंत गोडसे यांचे सहकार्य मिळाले. या अभ्यासदौऱ्यात विभागप्रमुख प्रा.सागर पेखळे,प्रा.आकाश कहांंडळ,प्रा.राहुल पगारे,प्रा.सचिन सासणे,प्रा.राहुल निकम यांचेसह ५५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.


  • -

सोशल चॅलेंज परिसंवाद

Category : social_projects

मराठा विद्या प्रसारक समाज संचलित समाजकार्य महाविद्यालयात सोशल चॅलेंज 2019 या थीम अंतर्गत एक दिवसीय परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवाद प्रसंगी उद्घाटन कार्यक्रमात विचारमंचावर पाणी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित भटकळ, म वि प्र समाजाचे संचालक सचिन पिंगळे, डॉ प्रशांत देवरे, निवृत्त प्राध्यापक व पाणी तज्ञ श्री अशोक सोनवणे, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विलास देशमुख, प्रा. प्रतिमा पवार उपस्थित होते.

सर्वप्रथम दीपप्रज्वलनाने परिसंवादाचे उद्घाटन करण्यात आले. पाणी फाउंडेशन चे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित भटकळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, यावेळी श्री भटकळ यांनी सत्यमेव जयते पासूनचा पाणी फाउंडेशन पर्यंतचा प्रवास सांगितला. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा, स्पर्धेचे नियम आणि मनसंधरणातून जलसंधारण हे ब्रीद घेऊन कार्याची केलेली सुरुवात सांगितली. प्रशिक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन, लोकांच्या सहभागातून पाणी फाउंडेशन कॅटॅलिस्ट ची भूमिका करते असेही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनात सांगितले. 24 जिल्हे, 75 तालुके व चार हजार गावांपर्यंत पोहोचून लोकांना सहभागी करून घेण्याचा यशस्वी आलेख समजावून विद्यार्थ्यांनाही सहभागी होण्याचे आवाहन माननीय श्री. सत्यजित भटकळ यांनी केले. परिसंवादाच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख अतिथी व मराठा विद्या प्रसारक समाजाचे संचालक मा. श्री. सचिन पिंगळे यांनी समाजकार्य महाविद्यालयाचे अभिनंदन केले व सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी समाजकार्य महाविद्यालयाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केले. या परिसंवादा च्याउद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष व मराठा विद्या प्रसारक समाजाचे संचालक डॉ.प्रशांत देवरे यांनी लोकांमध्ये एकजूट असेल तर कोणतेही कार्य थांबणार नाही आणि पाणी प्रश्नांवर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था व शासन यांच्या विषयी मार्गदर्शन केले.

प्रथम सत्रात निवृत्त प्राध्यापक व पाणी तज्ञ अशोक सोनवणे यांनी भारतातील जलसंवर्धनाची पार्श्वभूमी व सद्यस्थिती विद्यार्थ्यांसमोर मांडली. त्यासोबत पाणी व्यवस्थापन पाण्याचे नियोजन कसे करावे हे सांगितले. राळेगणसिद्धी, हिवरेबाजार या गावांची लोकसहभागातून जलव्यवस्थापन केल्या बद्दल मार्गदर्शन ही त्यांनी केले.

द्वितीय सत्रात समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी अक्षय बोंबले व काजल थोरात, नीलम मोजाड, पाटील गौरव यांनी जलनीती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच जलसाक्षरता व व्यवस्थापन या विषयावरील शोधनिबंध सादर केले.
द्वितीय सत्रात सॅमसोनाईट साऊथ एशिया प्रा लि चे सहाय्यक संचालक मिलिंद वैद्य यांनी इगतपुरी तालुक्यातील 11 गावातील जलसंवर्धनाची केस स्टडी सादर केली. सॅमसोनाईट ची कार्यपद्धती सांगितली प्रामुख्याने पूर्व सर्वेक्षण, कार्याची पद्धती, चालू करतो पाठपुरावा रणनीती काम झाल्यानंतर चा आढावा कसा घेतला गेला व त्यातून आठ धरणे व तीन विहिरी बांधले तसेच चार लाखांच्या पुढे इगतपुरी परिसरात वृक्षारोपण केले. याचीही विद्यार्थ्यांसमोर मांडणी केली. तसेच बॉस इंडिया फाउंडेशन, बंगलोर येथील क्षेत्र प्रकल्प संचालक सुशांत राऊत यांनी जलयुक्त शिवार अभियान व पाच गावातील केलेले कार्य विद्यार्थ्यांच्या समोर केस स्टडी च्या रूपाने सादर केले. त्यामध्ये लक्ष्मण पाडा, पहिने, सामुंडे, वाडीपाडा या गावांचे जलसंवर्धनातून , शेती व पशुसंवर्धन भाजीपाला लागवड करून त्यांना फायदा झाला. दोनशे कुटुंबांचा सहभाग किती महत्त्वाचा होता हे देखील श्री राऊत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनातून सांगितले. तसेच या गावांवर आधारित चित्रफितही दाखविण्यात आली.

समारोप सत्रात प्रा. चंद्रप्रभा निकम यांनी परिसंवादाचे अहवाल वाचन केले. प्रा डॉ घनश्याम जगताप यांनी आभार व्यक्त केले.सोशल चॅलेंज 2019 च्या एक दिवशीय परिसंवादाचे प्रास्ताविक प्रा. प्रतिमा पवार यांनी केले,स्वागतपर मनोगत समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विलास देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.सोनल बैरागी, पाहुण्याचा परिचय प्रा. प्रतिमा पगार, प्रा मनीषा शुक्ल यांनी केला तसेच आभार प्रदर्शन प्रा डॉ घनश्याम जगताप यांनी केले. या वेळी विविध सामाजिक संस्था प्रतिनिधी, विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थीत होते.


  • -

राष्ट्रीय स्तरावरील इन्स्पायर अवाॅर्ड विज्ञान प्रदर्शनासाठी मराठा हायस्कूलच्या ऐश्वर्या गुंजाळची निवड.

Category : social_projects

केंद्र शासन, महाराष्ट्र शासन, विद्या प्राधिकरण पुणे,विज्ञान शिक्षण संस्था नागपूर व नानासाहेब महाडिक अभियांत्रिकी महाविद्यालय पेठ नाका सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ८ व्या राज्य स्तरीय इन्सपायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूलची विद्यार्थिनी ऐश्वर्या गुंजाळ हिची राष्ट्रीय स्तरावरील दिल्ली येथे होणाऱ्या इन्स्पायर अवाॅर्ड  विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली.

              ऐश्वर्या हिने दैनंदिन जीवनातील एक मोठी समस्या ‘ वाढते प्रदुषण ‘  या विषयावर  एअर प्युरिफायर ही प्रतिकृती तयार केली होती. प्रदर्शनात तिने अतिशय उत्तम सादरीकरण करून त्या उपकरणाची गरज स्पष्ट केली. त्यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान वापरून ही समस्या कायमचीच दूर होऊ शकते हे तिने  खात्रीशीर पटवून दिले. तिच्या या साध्या व सोप्या तंत्रज्ञानाचा सामान्य लोकांना सुद्धा उपयोग होईल. यासाठी परीक्षकांनी तिची राष्ट्रीय स्तरावर निवड केली. तिचा सत्कार मविप्रचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रा.संजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.  तिला विज्ञान शिक्षक हेमंत पाटील , ज्ञानेश्वर शिंदे , संगिता आहेर,कलाशिक्षक जगदीश डिंगे व इतर सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

            तिच्या या यशाबद्दल मविप्र समाज संस्थेचे अध्यक्ष डाॅ. तुषार शेवाळे,सरचिटणीस निलिमाताई पवार,चिटणीस डाॅ. सुनील ढिकले, सभापती माणिकराव बोरस्ते,उपसभापती राघो नाना आहिरे,नाशिक शहर तालुका संचालक नानासाहेब महाले,नाशिक ग्रामीण तालुका संचालक सचिन पिंगळे व सर्व संचालक मंडळ,मविप्र समाज संस्थेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रा.संजय शिंदे,विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण पवार, उपमुख्याध्यापक एस्.डी.शिंदे,पर्यवेक्षक एन.एफ.बोराडे, एस्.बी.सोमवंशी, विजय म्हस्के, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

फोटो  – नाशिक येथील मराठा हायस्कूल मध्ये राज्य स्तरावरुन राष्ट्रीय स्तरावर इन्स्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनासाठी ऐश्वर्या गुंजाळ हिची निवड झाल्याबद्दल सत्कार करतांना मविप्र समाज संस्थेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रा.संजय शिंदे,समवेत विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण पवार,उपमुख्याध्यापक एस.डी.शिंदे,पर्यवेक्षक एन.एफ.बोराडे,एस.बी.सोमवंशी,विजय म्हस्के,यशस्वी विद्यार्थीनी ऐश्वर्या गुंजाळ,मार्गदर्शक शिक्षक आदी


  • -

मविप्रच्या फार्मसी महाविद्यालयाचे जीपॅट परीक्षेत यशाची परंपरा कायम …

Category : social_projects

भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून (AICTE) दरवर्षी फार्मसी च्या विद्यार्थ्यांकरिता जी पॅट (Graduate Pharmacy Aptitude Test) ही अखिल भारतीय स्तरावरील परीक्षा घेण्यात येते,शैक्षणिक वर्ष २०१९ च्या जी-पॅट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असुन मविप्रच्या कॉलेज ऑफ फार्मसी मधील आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत ४० विद्यार्थ्यांनी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.यापैकी सौरभ भोरकडे व साक्षी पगार यांनी ऑल इंडीया रँकमध्ये बारावा क्रमांक पटकाविला. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ऑल इंडिया रँक १०० च्या आत महाविद्यालयाचे ०९ विद्यार्थी आहेत. सदर परीक्षेसाठी देशातून ३५ हजार विद्यार्थी बसलेले होते.उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण घेतांना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परीषद,नवी दिल्ली यांच्याकडून दरमहा १४,४०० रु. शिष्यवृत्ती देण्यात येते.

मविप्र फार्मसी महाविद्यालय हे पुणे विद्यापीठातील सर्वात जुने व सरकारी अनुदान मिळत असलेले एकमेव फार्मसी महाविद्यालय आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी आज मोठ्या संख्येने नायपर (चंडीगड ),आयसीटी (मुंबई ),बिट्स (पिलानी),यासारख्या ठिकाणी पुढील शिक्षण घेत आहेत तसेच अनेक विद्यार्थी औषधनिर्माण क्षेत्रातील औद्योगिक,शैक्षणिक व संशोधन विभागात देशात व परदेशात शिक्षण घेत आहेत.

सर्व  यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ तुषार शेवाळे , सरचिटणीस श्रीमती निलिमाताई पवार , सभापती माणिकराव बोरस्ते , चिटणीस डॉ सुनिल ढिकले , उपसभापती राघोनाना अहिरे ,सर्व संचालक , शिक्षणाधिकारी डॉ एन एस पाटील ,प्राचार्य डॉ डी व्ही डेर्ले,प्रा.अशोक पिंगळे,एम फार्म कोर्स समन्वयक व उपप्राचार्य  डॉ.मिलिंद वाघ व शिक्षकेतर सेवकांनी अभिनंदन केले आहे.


  • -

मविप्र कृषी महाविद्यालयाकडून माती परीक्षण जनजागृती मोहीम …

Category : social_projects

 मविप्रच्या कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग यांच्या वतीने नाशिक जिल्हा मानव विकास कार्यक्रमांतर्गत फिरती माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळेच्या माध्यमातून चांदोरी ता.निफाड येथे माती व पाणी परीक्षण जनजागृती अभियान राबविण्यात आले, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक प्रल्हाद दादा गडाख होते. त्यांनी माती परीक्षणाचे महत्व सांगतांना माती परीक्षण हि काळाची गरज असून प्रत्येक शेतकऱ्याने माती परीक्षण करूनच खतांच्या मात्रा पिकास देण्याचे आवाहन केले.

या उपक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आय.बी.चव्हाण यांनी प्रत्येक शेतकऱ्याने माती परीक्षण करावे असे सांगून सेंदीय शेतीचे महत्व विषद केले. तसेच रासायनिक खतांचा वापर कमी करून विषमुक्त शेतीकडे वाटचाल करावी असे सांगितले. विभागाच्या प्रमुख श्रीमती डॉ.ए.ए.बोडके यांनी माती व पाणी परिक्षणाबद्दल माहिती दिली.प्रा.श्रीमती एम.एस.मगर यांनी आभार मानले.उपक्रमासाठी प्रयोगशाळा सहाय्यक के.पी.पवार तसेच चांदोरी गावचे उपसरपंच शिरीष गडाख,पोलीस पाटील अनिल गडाख,योगगुरू मधुकर आवारे, मधुकर टर्ले,विजय बागस्कर,शिवाजी गडाख, चंदूशेठ गायखे,विद्यार्थी उपस्थित होते. सदर उपक्रमासाठी संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार व शिक्षणाधिकारी डॉ.एन.एस.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.


  • -

अभ्यासात संमिश्र अध्ययन पद्धतीचा समावेश असावा – डॉ.अनिता पिल्लई …

Category : social_projects

रावसाहेब थोरात सभागुहात आंतरराष्ट्रीय परिषदेला सुरुवात 

आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी दृश्य साक्षरतेचा (Visual Literacy) समावेश असावा, यामध्ये डीजीटल स्टोरी टेलींग मध्ये व्याकरणावर भर न देता कथेच्या माध्यमातून तो विषय विद्यार्थ्यांसमोर मांडला जातो. या अभ्यासात संमिश्र अध्ययन पद्धतीचा समावेश असावा असे मत सिंगापूरच्या डॉ. अनिता पिल्लई यांनी व्यक्त केले त्या मविप्र समाजाच्या के टी एच एम महाविद्यालय मराठी,हिंदी व इंग्रजी विभागाच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी रावसाहेब थोरात सभागृहात बोलत होत्या.यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार होत्या. यावेळी मॉरीशसच्या श्रीमती मधुमती कौंजुल, लक्ष्मी झुम्मून, नेपाळ चे प्रा. लक्ष्मण ग्यानवळी, श्रीलंकेचे प्रा. उपुल रणजीत तसेच डॉ. मृगेंद्र पाटील (मुंबई), डॉ. संजय करंदीकर व डॉ. नवनीत चव्हाण (गुजरात), डॉ.करूणा उपाध्याय व डॉ. अभिजित देशपांडे (मुंबई), डॉ.संजीवकुमार जैन (भोपाळ), डॉ.पौर्णिमा कुलकर्णी, डॉ.प्रशांत मोघे,संस्थेचे शिक्षणाधिकारी  डॉ.डी.डी.काजळे,डॉ.आर.डी.दरेकर, सी.डी.शिंदे,प्राचार्य डॉ.दिलीप धोंडगे,डॉ.वेदश्री थिगळे, उपप्राचार्य डॉ.एम.बी.मत्सागर, समन्वयक डॉ.पी.व्ही.कोटमे, डॉ. डी.पी.पवार,डॉ. वाय.आर.गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.
        आजच्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये साहित्य,संस्कृती,समाज व माध्यमांतर या विषयाच्या माध्यमातून विद्यार्थी स्वतःला चांगले अभिव्यक्त करू शकतील या अभिव्यक्तीला डिजिटल तंत्रज्ञानाची साथ मिळाली तर विद्यार्थ्यांचा प्रभावी कौशल्यविकास होऊ शकतो असेही पिल्लई यांनी यावेळी सांगितले.
   अध्यक्षीय मनोगतात सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार यांनी ‘ साहित्यामुळे आपला सामाजिक पिंड घडतो,वेगवेगळ्या काळातील साहित्यकृती या त्या-त्या वेळेच्या सामाजिक परिस्थितीतून निर्माण झाल्या.विचार आंदोलने साहित्यातूनच प्रगट होतात.साहित्य हा समाजाचा आरसा असून व्यक्ती हा साहित्याच्या केंद्रस्थानी आहे.संत ज्ञानेश्वरांपासून रामदासांपर्यंत सर्वांनी समाजाला प्रेरित केले. संत ज्ञानेश्वरांनी पसायदानात सत्य,अहिंसा आणि करुणेचा समावेश केला.ज्ञानेश्वरी व पसायदान समाजासाठी मांडले. साहित्यासाठी हा सुवर्णकाळ असल्याचे सांगून या दोनदिवशीय चर्चासत्रास त्यांनी शुभेच्छा दिल्या.
  मॉरीशस च्या प्राध्यापिका श्रीमती मधुमती कौंजुल यांनी आपल्या बीजभाषणात ‘ १९७७ मध्ये सर्वप्रथम मराठी भाषा मॉरीशस विद्यापीठात शिकविण्यास सुरुवात झाली.आपली भाषा,संस्कृती आणि परंपरा टिकविण्यासाठी मॉरीशसमध्ये आपले भारतीय गुढीपाडवा,महाराष्ट्र दिन,गणेशचतुर्थी,दीपावली,मराठी भाषा दिन यासोबतच ईद-उल-फित्र,ख्रिसमस सणही उत्साहात साजरे होतात.या बरोबरच मराठी भाषा संवर्धनासाठी व वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले.
     श्रीलंका येथील हिंदी विभागप्रमुख डॉ विपुल रणजीत यांनी ‘ श्रीलंकेत हिंदी अभ्यासाला १८८० साली एल्फिन्स्टन नाटक कंपनीचे आगमन झाल्यामुळे सुरुवात झाल्याची नोंद आहे.रामायण आणि महाभारताने तेथील जनतेला प्रभावित केले आहे. १९३४ सालापासून श्रीलंकेतील शाळांमध्ये हिंदी विषय शिकविण्यास सुरुवात झाली. आज श्रीलंकेतील ६ विश्व विद्यालयांमध्ये ७ व्यक्ती हिंदी विषय शिकविण्याचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मराठी,हिंदी,इंग्रजी विषयातून आलेल्या २४० संशोधन पेपरच्या पुस्तिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक डॉ.योगेश गांगुर्डे यांनी सुत्रसंचलन प्रा.तुषार पाटील यांनी तर आभार प्रा.राजेंद्र हिरे यांनी मानले.


  • -

के. टी. एच. एम. महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

Category : Uncategorised

साहित्य, संस्कृती, समाज व माध्यमांतर या विषयाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये दोन दिवस जे विचारमंथन झाले.त्यातून प्रत्येकाला येथून सामाजिक जाणीवेतून काहीतरी घेऊन जाता येईल. या ठिकाणी तीनही भाषांच्या माध्यमातून साहित्याचे विविध अंगांनी जो अभ्यास झाला, त्यातून समाज व समाजातून संस्कृतीचे दर्शन घडले. साहित्याचे समाज आणि संस्कृतीमध्ये मोठे महत्व असून साहित्याच्या माध्यमातूनच नटसम्राट, पु.ल. देशपांडे यांच्यावरील भाई यासारख्या चित्रपटांची निर्मिती झाली असे मविप्र संचालक सचिन पिंगळे यांनी सांगितले ते के टी एच एम महाविद्यालय मराठी, हिंदी व इंग्रजी विभागाच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप प्रसंगी व्ही.एल.सी सभागृहात बोलत होते.यावेळी व्यासपीठावर मॉरीशसच्या श्रीमती मधुमती कौंजुल, लक्ष्मी झुम्मून, नेपाळ चे प्रा.लक्ष्मण ग्यानवळी, श्रीलंकेचे प्रा.उपुल रणजीत तसेच डॉ. मृगेंद्र पाटील (मुंबई), डॉ. संजय करंदीकर व डॉ. नवनीत चव्हाण (गुजरात), डॉ.करूणा उपाध्याय व डॉ.अभिजित देशपांडे (मुंबई), डॉ.संजीवकुमार जैन (भोपाळ), डॉ.पौर्णिमा कुलकर्णी, समन्वयक डॉ. पी. व्ही.कोटमे, डॉ. डी. पी. पवार, डॉ. वाय. आर. गांगुर्डे उपस्थित होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.बी.गायकवाड यांनी ‘ विज्ञान आणि सामाजिक शास्र विषयांच्या चर्चासत्रांचे आयोजन बऱ्याच ठिकाणी केले जाते मात्र भाषेचा विषय घेऊन आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्याचे निश्चित केले,यामागील हेतू हाच होता कि ‘ विविध देशातील आपल्या असलेल्या संस्कृती,परंपरेचे दर्शन तसेच यासंदर्भातील माहिती विद्यार्थी व संशोधकांपर्यंत पोहोचविणे. आजच्या काळात ई-लर्निंग,पी लर्निंग आणि एम (मोबाईल ) लर्निंग चा अवलंब केला जात असतांनाही या परिषदेसाठी ठेवण्यात आलेल्या विविध विषयांमधून जे विचारमंथन झाले,तसेच संशोधकांनी जे अभ्यासपूर्ण पेपर सादर केले त्याचा निश्चितच उपयोग सगळ्यांना होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी परिषदेच्या यशस्विते व आयोजनासंदर्भात काही संशोधकांनी आपले विचार व्यक्त केले यात डॉ.सालेम अब्दुल कवीद (येमेन) यांनी सांगितले कि ‘ या परिषदेतून भारतीय संस्कृती आणि साहित्य याच्या आम्ही खूप जवळ आलो.मानवतेचे एक प्रतिक आम्हाला भारतात बघायला मिळाले.आम्ही एक परिवार म्हणून या ठिकाणी राहिलो.

या दोन दिवशीय चर्चासत्रामध्ये जी विषयांची निवड करण्यात आली होती,त्या विषयांवर सर्व संशोधकांनी अभ्यासपूर्ण शोधनिबंध सादर केले.यामधून आपली संस्कृती हि केवळ भारतातच नव्हे तर विदेशातही टिकून राहिलेली आहे असे डॉ.पोर्णिमा कुलकर्णी यांनी सांगितले.

डॉ.मधुमती कौंजून यांनी या चर्चासत्रातून आम्ही आपली संस्कृती,परंपरा आणि भाषा हि मॉरीशस या देशामध्ये मोठ्या प्रमाणात टिकविलेली आहे.आपल्या भाषेच्या संवार्धानासाठि आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत असे सांगितले ‘

यावेळी मान्यवरांच्या हस्ते सहभागी संशोधकांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. सुत्रसंचलन प्रा. तुषार पाटील यांनी तर आभार डॉ.दिलीप पवार यांनी मानले.


OUR RECRUITERS

CONTACT US

  •  Office : Shivaji Nagar,
  • Gangapur Road, Nashik,
  • Nashik-422002,
  • Maharashtra, India.
  • +91-253-2574511,
  • 2573422 , 2573306
  •  Fax : +91-253-2579863
  •  ndmvpsamajnashik@yahoo.co.in

LOCATION