बहुजन हिताय बहुजन सुखाय

मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक.

Maratha Vidya Prasarak Samaj, Nashik.

Central Office, Shivaji Nagar, Gangapur Road, Nashik-422002, Maharashtra, India.

Category Archives: Uncategorised

  • -

मविप्रच्या कोव्हिड रुग्णालयात ६३६ रुग्णांची करोनावर मात

Category : Uncategorised

मविप्रच्या डॉ. वसंतराव पवार वैदयकिय महाविदयालयाच्या रुग्णालयात ९०१ कोविड रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. त्यात ६३६ रुग्ण बरे झाले असून यात पोलीस व त्यांचे नातेवाईक आणि सामान्य नागरिकांचा समावेश आहे. रुग्णालयातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१ टक्के इतके आहे. तर महाविद्यालयातील कोविड टेस्टिंग लॅब मध्ये जुलै अखेर तेरा हजार चाळीस रुग्णांचे करोना स्वॅब टेस्ट करण्यात आले आहेत. महाविद्यालयाच्या डेडिकेटेड कोविड रुग्णालय (डीसीएच) ६० खाटा तर कोविड केयर सेंटर मध्ये १०० खाटांचे रुग्णालय आहे. या कोविड रुग्णालयातील डीसीएच मध्ये अति गंभीर बाधित रुग्णांसाठी आरआयसीयु या विशेष अतिदक्षता कक्षात चोवीस तास तज्ञ् डॉक्टरांच्या देखरेखीखाली व सल्ल्याने औषधोपचार केले जातात. निवासी डॉक्टर,फिजिओथेरपी,नर्सिंग,परिचारिका, वॉर्डबॉय, आया यांच्या सेवा तसेच डेडिकेटेड कोविड रुग्णालयाच्या सुसज्ज कक्षात ऑक्सिजनची सुविधा असलेल्या खाटा , व्हेंटिलेटर , मोबाईल एक्स-रे , लॅब अश्या सुविधा चोवीस तास उपलब्ध आहे. तसेच वैद्यकीय उपचार व्यवस्थापनासोबतच रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेतांना चांगल्या दर्जाचे जेवण, शुद्ध पिण्याचे पाणी , गरम पाणी पुरविले जात आहे. मविप्रच्या रुग्णालयात मागील १ मेला पहिला करोना बाधित रुग्ण दाखल झाला होता.

डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात करोनाच्या प्रारंभी च्या काळात कोरोना विषयक स्वतंत्र स्क्रिनिंग ओपीडी सुरु करण्यात आली. ती आजही सुरु असून या ठिकाणी रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची तपासणी करण्यात येते व प्राथमीक लक्षणे असलेली व संशयित रुग्णांना वेगळे करण्यात येते. आजवर या कोविड बाह्यरुग्ण विभागात जुलै अखेर ८१७५ इतक्या रुग्णांची कोरोनाविषयक प्राथमिक तपासणी करण्यात आली आहे.


  • -

  • -

के. टी. एच. एम. महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

Category : Uncategorised

साहित्य, संस्कृती, समाज व माध्यमांतर या विषयाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये दोन दिवस जे विचारमंथन झाले.त्यातून प्रत्येकाला येथून सामाजिक जाणीवेतून काहीतरी घेऊन जाता येईल. या ठिकाणी तीनही भाषांच्या माध्यमातून साहित्याचे विविध अंगांनी जो अभ्यास झाला, त्यातून समाज व समाजातून संस्कृतीचे दर्शन घडले. साहित्याचे समाज आणि संस्कृतीमध्ये मोठे महत्व असून साहित्याच्या माध्यमातूनच नटसम्राट, पु.ल. देशपांडे यांच्यावरील भाई यासारख्या चित्रपटांची निर्मिती झाली असे मविप्र संचालक सचिन पिंगळे यांनी सांगितले ते के टी एच एम महाविद्यालय मराठी, हिंदी व इंग्रजी विभागाच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप प्रसंगी व्ही.एल.सी सभागृहात बोलत होते.यावेळी व्यासपीठावर मॉरीशसच्या श्रीमती मधुमती कौंजुल, लक्ष्मी झुम्मून, नेपाळ चे प्रा.लक्ष्मण ग्यानवळी, श्रीलंकेचे प्रा.उपुल रणजीत तसेच डॉ. मृगेंद्र पाटील (मुंबई), डॉ. संजय करंदीकर व डॉ. नवनीत चव्हाण (गुजरात), डॉ.करूणा उपाध्याय व डॉ.अभिजित देशपांडे (मुंबई), डॉ.संजीवकुमार जैन (भोपाळ), डॉ.पौर्णिमा कुलकर्णी, समन्वयक डॉ. पी. व्ही.कोटमे, डॉ. डी. पी. पवार, डॉ. वाय. आर. गांगुर्डे उपस्थित होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.बी.गायकवाड यांनी ‘ विज्ञान आणि सामाजिक शास्र विषयांच्या चर्चासत्रांचे आयोजन बऱ्याच ठिकाणी केले जाते मात्र भाषेचा विषय घेऊन आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्याचे निश्चित केले,यामागील हेतू हाच होता कि ‘ विविध देशातील आपल्या असलेल्या संस्कृती,परंपरेचे दर्शन तसेच यासंदर्भातील माहिती विद्यार्थी व संशोधकांपर्यंत पोहोचविणे. आजच्या काळात ई-लर्निंग,पी लर्निंग आणि एम (मोबाईल ) लर्निंग चा अवलंब केला जात असतांनाही या परिषदेसाठी ठेवण्यात आलेल्या विविध विषयांमधून जे विचारमंथन झाले,तसेच संशोधकांनी जे अभ्यासपूर्ण पेपर सादर केले त्याचा निश्चितच उपयोग सगळ्यांना होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी परिषदेच्या यशस्विते व आयोजनासंदर्भात काही संशोधकांनी आपले विचार व्यक्त केले यात डॉ.सालेम अब्दुल कवीद (येमेन) यांनी सांगितले कि ‘ या परिषदेतून भारतीय संस्कृती आणि साहित्य याच्या आम्ही खूप जवळ आलो.मानवतेचे एक प्रतिक आम्हाला भारतात बघायला मिळाले.आम्ही एक परिवार म्हणून या ठिकाणी राहिलो.

या दोन दिवशीय चर्चासत्रामध्ये जी विषयांची निवड करण्यात आली होती,त्या विषयांवर सर्व संशोधकांनी अभ्यासपूर्ण शोधनिबंध सादर केले.यामधून आपली संस्कृती हि केवळ भारतातच नव्हे तर विदेशातही टिकून राहिलेली आहे असे डॉ.पोर्णिमा कुलकर्णी यांनी सांगितले.

डॉ.मधुमती कौंजून यांनी या चर्चासत्रातून आम्ही आपली संस्कृती,परंपरा आणि भाषा हि मॉरीशस या देशामध्ये मोठ्या प्रमाणात टिकविलेली आहे.आपल्या भाषेच्या संवार्धानासाठि आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत असे सांगितले ‘

यावेळी मान्यवरांच्या हस्ते सहभागी संशोधकांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. सुत्रसंचलन प्रा. तुषार पाटील यांनी तर आभार डॉ.दिलीप पवार यांनी मानले.


  • -

विकासाच्या व विस्थापनाच्या अभ्यासातून वास्तवाची जाणीव करून देणे आणि धोरणांना आकार देणे गरजेचे – राकेश दिवाण

Category : Uncategorised

विकास आणि विस्थापनाचा पुनर्विचार राष्ट्रीय चर्चासत्राचा  समारोप

मविप्र. समाजाचे के. टी. एच. एम. कॉलेजचा समाजशास्त्र विभाग व  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २४ व २५ जानेवारी २०१९ रोजी आयोजित  “विकास आणि विस्थापनाचा पुनर्विचार” या  राष्ट्रीय चर्चा सत्राची यशस्वी सांगता झाली. या प्रसंगी मध्यप्रदेशचे पत्रकार, संशोधक राकेश दिवाण यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात. ‘ विकास ही उन्नत, समाधानी आनंदी जीवनाची स्थिती आहे. मूळ गरजांची पूर्ती होणे ही पहिली पायरी असते. त्या गरजा पूर्ण होण्यातून विकासाची प्रक्रिया सुरु होते. पण शहर केंद्रित विकासामुळे वंचित, आदिवासींचे, शेतकर्यांचे झालेले विस्थापन त्यांचे शाश्वत जगणेच धोक्यात आणत आहे. विकास प्रकल्पांचे दावे केले जातात. पण हे दावे प्रत्यक्षात येतात का हे पहिले जात नाही. उदा. नर्मदा प्रकल्पाचे पूर नियंत्रण, वीज निर्मिती, आणि शेती व पिण्याच्या पाण्याची उपलब्धी याबाबतचे दावे खरे झाले नाही. विकासाच्या व विस्थापनाच्या अभ्यासातून या वास्तवाची जाणीव करून देणे आणि धोरणांना आकार देणे शक्य होईल असे ते म्हणाले.

या राष्ट्रीय चर्चासत्रात  नंदिनी सुंदर (दिल्ली विद्यापीठ), डॉ. श्रुती तांबे ( पुणे विद्यापीठ) मेघनाथ भट्टाचार्य ( रांची  झारखंड), डॉ. रमेश मांगलेकर ( बंगरुळू) आदींनी आपले अभ्यास व  विचार व्यक्त केले.संशोधक व प्राध्यापक यांनी आपले लेख सादर केले.

या राष्ट्रीय चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी मविप्र. सरचिटणीस श्रीमती  निलीमाताई पवार व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक डॉ. संजय सावळे, प्रा. डी. एच. शिंदे , प्रा. उमेश शिंदे , प्रा. शशिकांत माळोदे , डॉ. योगेश गांगुर्डे आदींनी  परिश्रम घेतले. उपप्राचार्य डॉ. बी. डी. पाटील,  डॉ. बी. जे. भंडारे, डॉ. आर.  डी.  दरेकर , प्रा. तुषार पाटील,  प्रा. टिळे . प्रा. पगार आदी उपस्थित होते.


  • -

विज्ञानाची कास सोडली तरच भारताचा विकास होईल – जेष्ठ पर्यावरण तज्ञ दिलीप कुलकर्णी …

Category : Uncategorised

डॉ.वसंतराव पवार व्याख्यानमालेत थोरात सभागृहात विचारमंथन …
      तंत्रज्ञान व माणसाच्या उपभोगामध्ये होणारी वाढ यामुळे आपण उत्पादनात वाढ करतो आहोत,मात्र त्यासोबत नैसर्गिक संसाधनेही संपवीत आहोत. जैवविविधतेलाहि मोठ्या प्रमाणात धोका पोहचवत आहोत.यंत्रांमुळे मानवाचा विकास खुंटला असून याला विज्ञानच जबाबदार आहे.मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड,जमिनीत रासायनिक खतांचा वापर यामुळे ऑक्सिजन चे प्रमाण कमी होऊन कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढत आहे. अधिक उत्पादन मिळविण्याच्या मोहात तसेच राष्ट्रीय उत्पादन वाढविण्याच्या स्पर्धेत आपले शारीरिक,मानसिक स्वास्थ बिघडवत आहोत.त्यामुळे विज्ञानाची कास सोडली तरच भारताचा विकास होईल असे प्रतिपादन जेष्ठ पर्यावरण तज्ञ डॉ.दिलीप कुलकर्णी यांनी केले ते के टी एच एम महाविद्यालय पत्रकारिता व जनसंज्ञापन विभाग आयोजित दहाव्या डॉ वसंतराव पवार व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफतांना रावसाहेब थोरात सभागृहात बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी  संस्थेचे सभापती माणिकराव बोरस्ते होते. व्यासपीठावर संचालक नाना महाले, प्रल्हाद गडाख, सचिन पिंगळे, सेवक संचालक प्रा. नानासाहेब दाते, गुलाब भामरे, शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. काजळे, डॉ.एन. एस. पाटील, प्रा. एस. के. शिंदे, उपप्राचार्य डॉ. एम. बी. मत्सागर, डॉ. जे. एस. आहेर, डॉ.श्रीमती बी. डी. पाटील,प्रा. डी. आर. पताडे,डॉ. बी. जे. भंडारे उपस्थित होते.
      व्यक्तीचे उपभोग वाढल्यामुळे कुटुंबाची हानी होत आहे.आपल्याला विज्ञानाला नाकारायचे नाही मात्र विज्ञानाच्या माध्यमातून माणसांच्या जाणिवांचा ,मनाचा,अध्यात्माचा विकास व्हावा हि अपेक्षा असून मानवानेही उपभोग व मर्यादांना आळा घातला तर आपल्याला खराखुरा विकास साधता येईल असे सांगून कुलकर्णी यांनी आपण विज्ञाननिष्ठ होऊ नका अशी देखील विनंती उपस्थित श्रोत्यांना केली मात्र वैज्ञानिक दृष्टिकोनाचा योग्य पद्धतीने वापर करणे मानवाच्या हिताचे ठरेल असेही त्यांनी अखेरीस सांगितले.
      अध्यक्षीय मनोगतात सभापती माणिकराव बोरस्ते यांनी ‘पुरुष व स्रीयांच्या तुलनेत स्रिया ह्या पर्यावरणाची काळजी अधिक प्रमाणात घेतात त्यामुळे पर्यावरण राखण्यास मोठे सहाय्य मिळते असे सांगून विद्यार्थ्यांनी आपला सर्वांगीण विकास साधण्यासाठी पर्यावरण राखण्याचा अवलंब आपल्या जीवनात करावा असे सांगितले.
      उद्घाटक नाना महाले यांनी आपल्या मनोगतात ‘विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी,त्यांनी ज्ञान आत्मसात करून स्वतःचा विकास करावा,त्याबरोबरच एक चांगले नागरिक बनून आजूबाजूच्या समाजासही सहाय्य करावे तसेच पर्यावरण या विषयावर देखील संशोधन करावे असे सांगितले.
      प्रास्ताविक समन्वयक प्रा.प्राची पिसोळकर यांनी केले.प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.श्रीमती संगिता पानगव्हाणे यांनी केले.सूत्रसंचलन कु.शरयू जाधव हिने तर आभार प्रा. योगेशकुमार होले यांनी मानले. यावेळी प्रा.गोकुळ सानप,प्रा.विशाखा ठाकरे उपस्थित होते.


  • -

107

डॉ. ना. का. गायकवाड विद्यालय, उसवाड
पाण्याच्या टाकी समोर, उसवाड, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक-423104
स्थापना वर्ष 1968

423104
dr.nkgv.uswad@mvp.edu.in

  • -

112

Category : Uncategorised

कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय पिंपळगाव बसवंत
मुंबई आग्रा महामार्ग, पिंपळगाव बसवंत, निफाड, नाशिक-422209
स्थापना वर्ष 1968

2550250064
srcollege.pimpalgaonb@mvp.edu.in

  • -

111

नूतन जवाहर विद्यालय, मनेगाव
धोंडवीर रोड, हनुमान नगर, मनेगाव, सिन्नर, नाशिक-422103
स्थापना वर्ष 1966

2551202580
nutan.manegaon@mvp.edu.in

  • -

110

Pundlik Bhimaji Kathale Madhymik Vidyalya, Mithsagare Tal sinner
Mthsagare-Wavi Road, Mithsagare, Sinnar, Nashik-422104
स्थापना वर्ष 1993

2551283424
kpkmv.mithsagare@mvp.edu.in

  • -

109

जनता विद्यालय रामेश्वर, ता.देवळा
शासकीय आश्रम शाळा रामेश्वर समोर, देवळा, नाशिक-423102
स्थापना वर्ष 1968

2592282160
jv.rameshwar@mvp.edu.in