Maratha Vidya Prasarak Samaj

‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

मविप्र संस्थेच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (आयएमआरटी) व असोसिएशन ऑफ इंडियन मॅनेजमेंट स्कूल्स (एआयएमएस) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले.
शिक्षणसंस्था आता फक्त माहितीच्या संग्रहालयात रूपांतरित होत आहेत, हे बदलायला हवे. मोबाइल व आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) ला विरोध करणाऱ्यांना युवा पिढी शत्रूसमान समजू लागली आहे. प्राध्यापकांनी आपली शिकविण्याची पद्धत व भूमिका बदलून माहिती पुरवणारे न राहता मूल्याधिष्टीत असायला हवी. ‘एआय’ अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता हे शिक्षणासाठी व व्यवसायासाठी वरदान आहे, असे प्रतिपादन या परिषदेत गोखले एज्युकेशन सोसायटीच्या आर. एस. सपट अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष साने यांनी केले.
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) हे आजचे टेक्नॉलॉजिकल वास्तव आहे. मानवी प्रगती आणि व्यावसायिक उत्क्रांतीसाठी एआयचा वापर उपयुक्त ठरतो आहे. शिक्षण, व्यवसाय, संरक्षण, न्यायदान, वैद्यकीय अशा सर्वच क्षेत्रांत एआय वापरले जात आहे. हे तंत्रज्ञान वास्तव मान्य करून व कोणतीही भीती न बाळगता ‘एआय’चा वापर समजून घेऊन तो सर्व क्षेत्रांत वाढवावा, असे मत मविप्र समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी आपल्या उदघाटनपर भाषणात व्यक्त केले.

Leave a Comment